एम.व्ही.पी. समाजाचे

के. टी. एच. एम. महाविद्यालय

(के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य, ए.एम. विज्ञान महाविद्यालय.)

MVP SAMAJ'S

K.T.H.M. COLLEGE, Nashik

(K.R.T. Arts, B.H. Commerce and A.M. Science College.)

Online Services

Links to E-Books from Google Drive

Events & Programs : 

1. कर्मवीर रावसाहेब थोरात कला, भाऊसाहेब हिरे वाणिज्य आणि आण्णासाहेब मुरकुटे विज्ञान (के. टी. एच. एम.) महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागामार्फत वाचनसंस्कृती : वाचनाचे महत्व " या विषयावर श्री. शरद पाटील यांनी माहिती संकलन करून विद्यार्थ्यांच्या वापरासाठी ती जतन केली. तरी सर्व विद्यार्थ्यांनी " वाचनसंस्कृती वाचनाचे महत्व  या संधीचा लाभ घ्यावा असे ग्रंथालय विभागाकडून आवाहन करण्यात आले.  

थोडे काही वाचनाची गोडी व आवड निर्माण करणेबाबत.......

"दिसा माजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे" असे रामदासस्वामी फार पूर्वीपासून सांगून जातात. ज्या माणसाचे आयुष्य अनुभव आणि वाचनाने समृध्द झाले आहे असा माणूस आपल्या क्षेत्रात तर उत्तम कामगिरी करतोच, पण चांगला माणूस म्हणनू देखील तो नावाजला जातो. प्रत्येकाची स्थिती,काळ,परिस्थिती, या नुसार अनुभव तर मिळत असतो, पण वाचनातून ज्ञान आणि समज मिळते.

काय वाचावे ?

सर्वात मुलभूत प्रश्न पडतो तो म्हणजे वाचन करायचं आहे पण नेमकं काय वाचावं? आम्ही रोज सोशल मिडियावर एकमेकांना पाठवलेल्या गोष्टी वाचतो, तेही वाचन आहे का? ते वाचन पुरेसं आहे का? तर नाही! वाचन म्हणजे तुम्ही एखादे पुस्तक, वर्तमानपत्र, लेख, अभिप्राय अशी एखादी गोष्ट वाचत असाल जिचा लेखक तुम्हाला माहिती आहे. सोशल मीडियावर फिरणारे निनावी मेसेज म्हणजे वाचन नव्हे.

सुरवातीला वृत्तपत्र किंवा मासिक यापासून तुम्ही सुरवात करू शकता. तुम्हाला कळतच नसेल की तुम्हाला नक्की काय वाचायला आवडेल, तर वर्तमानपत्रात तुम्हाला सामाजिक, आर्थिक, ललित, निबंध, बातम्या सर्व स्वरूपाचे वाचन साहित्य वाचायला मिळेल. त्यातून तुम्हाला काय आवडते ते वाचणे सुरु ठेवा आणि त्या विषयासंबंधीची पुस्तके, शोधनिबंध अशा अनेक गोष्टी तुम्ही मिळवून तुम्ही वाचू शकता.

कसे वाचावे ?

तंत्रज्ञान वेगाने बदलते आहे तशी वाचनाची साधने बदलत आहेत. आता तुम्ही इ-बुक्स,इ-मॅगझिन, इ-वृत्तपत्र असे सर्व साहित्य तुमच्या मोबाईल किंवा संगणकावर वाचू शकता. ते मिळवण्यासाठी ग्रंथालय, दुकान कशाचाही शोध घेण्याची गरज नाही. तुमच्या बोटाच्या टोकावर सर्वकाही मिळू शकते.

तुम्हाला जर वाचनाच्या पारंपारिक पद्धतीला चिकटून राहायचे असेल, तर थेट पुस्तके, वृत्तपत्र आणून भौतिकमाध्यमाने तुम्ही वाचू शकता. याशिवाय 'किंडल' नावाचे एक नवीन तंत्रज्ञान सध्या प्रचलित आहे. ज्यावर तुम्हाला हवे ते पुस्तक, वर्तमानपत्र तुम्ही मोबाईल प्रमाणे पण अधिक सोयीस्करपणे वाचू शकतो. त्यामुळे तुमच्या डोळ्यावर तानाही येत नाही.

वाचन कशासाठी ?

१. बुद्धीला चालना :- मेंदू जितका कार्य करत राहील तितकी त्याची कार्यक्षमता वाढते असे सांगितले जाते. वाचन म्हणजे मेंदूसाठीची कसरत किंवा व्यायाम आहे. वाचनाने मेंदू सतत कार्यरत राहतो आणि अधिक कार्यक्षम होतो. म्हणून लहान मुलांमध्ये वाचनाची सवय लागली, तर पुढे मोठे होऊन ही मुलं हुशार बनतात.

२. ताणापासून सुटका :- व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात वाचन हे असे औषध आहे जे तुमचा कंटाळा, ताण झटक्यात दूर करतं. पुस्तक वाचताना तुम्ही तुमचं आयुष्य विसरून एका वेगळ्या जगात असता. हे जग तुम्हाला ताण विसरायला भाग पडते.

३. शब्दसंपत्ती :- माणसाची श्रीमंती त्याच्या शब्दसंपत्तीवर पहिली जाते. फक्त याचसाठी नाही, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही आपले म्हणणे किती योग्य शब्दात मांडू शकता, यावर तुमचे यश अवलंबून आहे. वाचनामुळे तुम्ही उत्तम संवाद साधू शकता, तसेच तुमच्या लेखन कौशल्यात भर पडते. त्यामुळे जितका जास्त शब्दसंग्रह, तितके यश तुमच्या जवळ असते.

४. ज्ञान :- ज्ञान मिळवण्यासाठी सर्वात विश्वासार्ह स्त्रोत म्हणजे पुस्तकं आहेत. ते ज्ञान स्वयंपाकातल्या एखाद्या पदार्थाचे असेल किंवा तत्वज्ञानातील एखाद्या संकल्पनेचे असेल, तुम्ही वाचत आहात म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होत आहे. थोडक्यात, वाचन हा ज्ञान मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

५. एकाग्रता :- वाचन ही एक साधना आहे, ज्यातून बुद्धी आणि मन यांना एक बैठक मिळते. ध्यान, नामस्मरण, मेडीटेशन या गोष्टी लक्ष एकाग्र करण्यासाठी जित्या उपयुक्त आहेत तितकीच वाचन देखील आहे.

६. मनोरंजन :-  डोळ्यांना, मेंदूला ताण देणाऱ्या मोबाईल गेम्सपेक्षा वाचनाची करमणूक केव्हाही चांगली. शिवाय ब्ल्यू व्हेल आणि पबजी सारख्या मनोरंजनापेक्षा कितीतरी पटीने वाचनाची सवय लाभदायक आहे.

वाचनाचे शेकडो फायदे आहेत आणि वाचन का करावे, याची अनेक करणं आहेत. वरील काही करणे शास्त्रीय संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आली आहेत. त्यामुळे पुस्तकांना आपला मित्र बनवा आणि आपलं जीवन समृद्ध करा.

2. वाचन आणि प्रेरणा दिन

के. टी. एच. एम. महाविद्यालयात दरवर्षी १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. पण मागील वर्षांपासून कोविड - १९ चे जागतिक संकट असल्याने  महाविद्यालयातर्फे मान्यवरांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून १६ ऑक्टोबरला ग्रंथप्रदर्शन भरवून साजरा करीत आहोत.आज ज्योती बुक स्टोअर्स यांच्यावतीने सदर ग्रंथ प्रदर्शन हे आपल्या महाविद्यालयाच्या कार्यालयासमोरील पोर्चमध्ये लावण्यात आले आहे. मा.वसंतराव खैरनार यांचे उपस्थितीत व मा.प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांचे हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी 10 वा झाले त्या वेळी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

" वाचनसंस्कृती  जतन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य तर आहेच परंतु एक अध्यापक या नात्याने व्यासंगवृत्ती अबाधित ठेवण्यासाठी ग्रंथ खरेदी करून तो वाचणे  वा  स्नेही आप्तांना विशेष निमित्ताने भेट देऊन वाचनासाठी प्रवृत्त करणे ही सुद्धा एक जबाबदारी आहे.वाचनसंस्कृती जपण्यासाठी पडलेले हे एक पाऊल आहे असे मानू या. 'ग्रंथ म्हणजे समाजसुख किंवा ग्रंथ उजळती मार्ग आपुला' या उक्तीला जागत आपण  आपल्या आवडीचे किमान एक तरी पुस्तक उद्या खरेदी करूया (सक्ती नव्हे) ,आणि  वाचनसंस्कृती जपुया " असे आवाहन प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड सरांनी केले.

ग्रंथ प्रदर्शन वेळ - सकाळी 10.00 ते दुपारी. 3.30

१५ ऑक्टोबर - वाचन प्रेरणा दिन (डॉ. कलाम थोडक्यात माहिती)

डॉ. अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम तथा ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे झाला होता.

शिक्षण :

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्या आणण्याचा व्यवसाय करीत. त्यांचे वडील व लक्ष्मणशास्त्री नावाचे पुजारी घनिष्ठ मित्र होते. त्यांच्यातील अध्यात्मिक चर्चा कलाम ऐकत असत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

 

स्वभाव :

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, पुस्तके वाचनाचा व मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. डॉ. कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

 

कार्य :

१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील पिएसएलव्ही (सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला. त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यामधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील 'अग्नी' क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

 

गौरव :

अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन ” म्हणून पाळला जातो.

भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९७ मध्ये ' भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

 

निधन :

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील आय.आय.एम.च्या कार्यक्रमात व्याख्यान देताना तबेत बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी २७ जुलै, इ.स. २०१५ रोजी अखेरचा श्वास घेतला.कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे.

 

महत्त्वाचे :

वाचन प्रेरणा दिन साजरा करताना डॉ. कलाम यांची पुस्तके वाचली तर खऱ्या अर्थाने त्यांना आज दिनी आदरांजली ठरेल असे मान्यवरांनी व्यक्त केले. त्यासाठी   डॉ. कलाम यांनी लिहिलेले पुस्तके व त्यांच्यावर लिहिलेले pdf स्वरूपात मोफत उपलब्ध असलेल्या पुस्तकांची लिंक खाली दिली आहे सर्व विद्यार्थांनी त्याचा वापर करावा असे आवाहन मान्यवरांनी केले.

https://www.pdfdrive.com/search?q=Dr.+APJ+Abdul+Kalam&pagecount=&pubyear=&searchin=&em=

3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती

बालपण आणि शिक्षण -

डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू येथे दि. १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई, आंबेडकरांचे वडील तिथल्याच सैनिकी शाळेमध्ये नोकरीला होते. १८९३ मध्ये वडील रामजी नोकरीमधून निवृत्त झाले. तेव्हा आपल्या मूळ गावी म्हणजे महाराष्ट्रातील सातारा येथे कुटुंबासह राहण्यास आले.

वयाच्या ५ व्या वर्षी भीमरावांना शाळेत घातले. आईचा मृत्यू त्यांच्या वयाच्या ६ व्या वर्षी झाला. त्या काळात समाजात असलेल्या स्पृश्यास्पृश्यतेचे चटके लहान भीमरावांना नेहमीच सहन करावे लागले. पण त्यातूनही प्रेरणा घेऊन ते आपल्या लक्ष्यावर कायम स्थिर राहिले. भीम खूप हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या शिक्षकांचे ते आवडते होते. त्यांनीच ‘आंबवडेकर’ हे त्यांचे आडनाव बदलून ‘आंबेडकर’ लिहिले.

प्राथमिक शाळेनंतर वडिलांनी त्यांचे नाव मुंबईच्या प्रसिद्ध एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये घातले आणि सगळे कुटुंब पटेल मजूर कॉलनीमध्ये भाड्याच्या घरात राहायला गेले. चाळीच्या गजबजाटामुळे भीमरावांचा अभ्यास नीट होत नव्हता. म्हणून मध्यरात्री दोन वाजताच उठून ते अभ्यासाला बसत असत. दिवसा चनीं रोड जवळील उद्यानात अभ्यासाला जात असत. तिथे केळुसकर नावाच्या एका विद्वान गृहस्थांशी भीमरावांची ओळख झाली. त्यांच्याकडून ते खूप काही चांगले शिकत गेले. इ. स. १९०७ साली भीमराव मॅट्रिक झाले.

सेनेमध्ये लेफ्टनंटच्या पदावर –

  घरची आर्थिक स्थिती तंगीची असल्यामुळे श्री. केळुसकरांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडांकडून त्यांना महिना बीस रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिली. इ. स. १९१२ मध्ये ते बी. ए. झाले. मग बडोदा रियासतीतच त्यांना सेनेमध्ये लेफ्टनंटच्या पदावर नोकरी मिळाली.

कोलंबिया विद्यापीठात पी. एच. डी -

           इ. स. १९९५ मध्ये ते एम. ए. झाले व इ. स. १९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठात त्यांनी पी. एच. डी.चा प्रबंध प्रस्तुत केला. नंतर लंडनला जाऊन ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’ विद्यापीठात अर्थशास्त्र व राजनीतिशास्त्राचा अभ्यास केला. त्याच वेळी त्यांच्या शिष्यवृत्तीचा कालावधी संपून बडोदा संस्थानात फौजी सचिवाच्या पदावर नोकरीला लागले. इथे त्यांच्यापेक्षा खालचे अधिकारी व कामगारांनी त्यांचा अधिकार मानला नाही. म्हणून अपमानित होऊन इ. स. १९१७ मध्ये नोकरी सोडून ते मुंबईला निघून आले.

छत्रपती शाहू महाराज मदत आणि कॉलेजमध्ये प्रोफेसर -

नोव्हेंबर १९१८ मध्ये ४५० रु. पगारावर, सिडनहॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. तरीही उच्च शिक्षण घेण्यासाठी भीमराव अस्वस्थ होते. म्हणून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज व मित्रांच्या मदतीने इ. स. १९२० मध्ये इंग्लंडला जाऊन बॅरिस्टरीचे शिक्षण घेऊ लागले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परतताना ते ३ महिने जर्मनीमध्ये थांबले. तेथे त्यांनी बॉन विश्वविद्यालयमध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले.

'बहिष्कृत हितकारिणी' -

         नोकरी काय, वकिली काय, प्रत्येक ठिकाणी त्यांची अस्पृश्यता आड येत होती. म्हणून त्यांनी मागासलेल्या व दलित जातींचे नेतृत्व करायला सुरुवात केली. शोषित-पीडितांच्या उद्धारासाठी ते कटिबद्ध झाले.देशात जागोजागी संस्था सुरू केल्या. मुंबईत ‘बहिष्कृत हितकारिणी’ सभा उघडली. या संस्थेमार्फत मागास, अस्पृश्य वर्गासाठी शाळा, विद्यार्थी वसतिगृह, ग्रंथालय सुरू केले. मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकरीची मागणी केली. सरकारला मान्य करावेच लागले. सरकारी आदेश निघाला की, सरकारमान्य, सरकारी साहाय्यता मिळालेल्या संस्थांमध्ये अस्पृश्यांना घ्यावेच लागेल. एका बाजूने डॉ. आंबेडकर सरकारकडून धागासवर्गियांना न्याय मिळवून देत होते। तर दुसऱ्या बाजूने अंधविश्वास वाईट चालीरीती मुळातून उखडून फेकण्याचा प्रयत्न करीत मंदिर प्रवेल, पाणीप्रश्न सोडविण्यात यशस्वी होत होते. 

अमेरिका प्रवास -

              अमेरिका प्रवासात डॉ. आंबेडकरांना आजपर्यंत कधीही न मिळालेल समानतेचा व्यवहार अनुभवायला मिळाला. लिंकन व वॉशिंग्टन यांची जीवनव वाचून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या अनुभवाला नवीन रंग मिळाला. अस्पृश्यांच् अधिकारांसाठी संघर्ष करायला विवश केले. ते जेव्हा १९१३ मध्ये अमेरिकेत गेले होते. तेव्हा लाला लजपतराय यांनी आंबेडकरांनी भारताच्या स्वातंत्र लढ्यात भाग घ्यावा, यासाठी खूप प्रयत्न केले होते. पण ते त्या वेळी सहमत नव्हते. आता त्यांचे भारताच्या राजकारणावरही नीट लक्ष होते. त्यांनी आपली पूर्ण ताकद भारतातील अस्पृश्योद्धारासाठी वापरली. ४ ऑक्टोबर १९३० व १२ सप्टेंबर १९३१ रोजी लंडनमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी मुंबईहन ते रवाना झाले होते. त्या परिषदेत भारतातील जातिव्यवस्थेसंबंधी जोरदार शब्दांत आपले विचार त्यांनी मांडले होते.

हरिजन सेवक संघ' स्थापना -

लंडन हून परतल्यावरही भारतात जातिव्यवस्था समाप्त करण्यासाठी त्यांनी संवर्ग सुरू केला. २० ऑक्टोबर १९३२ ला इंग्रज प्रधानमंत्र्यांनी अस्पृश्यांसाठी सर्व मतदारसंघाची घोषणा केली. पण या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण आरंभिले. शेवटी पुण्यात झालेल्या एका चर्चेत अस्पृश्यांना वेगळा मतदारसंघ न देता त्यांना वेगळे प्रतिनिधित्व देण्याचे निश्चित ठरले. काँग्रेसने अस्पृश्यांना काही विशेष सुविधा दिल्या. तेव्हापासून अस्पृश्यांबरोबर असलेल्या हिंदूंच्या दृष्टिकोनात बराचसा फरक झाला.

पंडित मदनमोहन मालवीयजींनी मुंबईतील एका मोठ्या सभेत अस्पृश्यांना विहिरी, तळी व सार्वजनिक ठिकाणांचा वापर करण्याचे अधिकार देण्याची घोषणा केली. यापुढे कोणाला अस्पृश्य म्हटले जाणार नाही असेही जाहीर केले. या सगळ्या धोरणांच्या कार्यवाहीसाठी अस्पृश्यता निवारण संघाची स्थापना केली. हाच पुढे ‘हरिजन सेवक संघ’ झाला. गांधींनी ‘हरिजन’ नावाची पत्रिका सुरू केली.

बौद्ध धर्माचा स्वीकार -

२९ नोव्हेंबर १९४८ रोजी संविधान सभेने डॉ. आंबेडकरांनी सादर केलेले संविधान भारतासाठी स्वीकारले. पण नंतर काही वैचारिक विरोधामुळे २७ सप्टेंबर १९५१ रोजी डॉ. भीमरावांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते मुंबईला आले. त्यानंतर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसऱ्याच्या दिवशी डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. कारण त्यांच्या मते हिंदू समाजात स्वतंत्रता व समानतेचा अभाव होता. दि. १५ नोव्हेंबर १९५६ ला त्यांनी विश्व बौद्ध संमेलनात भाग घेतला. त्यांच्याबरोबर अनेकांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

अस्पृश्यते विरुद्ध संघर्ष -

         आंबेडकर म्हणाले होते, “अस्पृश्यता ही गुलामीपेक्षा वाईट आहे.” आंबेडकरांना बडोदा संस्थानाने शिक्षण दिले होते, त्यामुळे त्यांची सेवा करणे बंधनकारक होते. त्यांची महाराजा गायकवाड यांच्या लष्करी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु जातिभेदामुळे त्यांना काही काळातच काढून टाकण्यात आले. अल्पावधीतच त्यांना ही नोकरी सोडावी लागली. त्यांनी या घटनेचे वर्णन त्यांच्या आत्मचरित्र वेटिंग फॉर अ व्हिसामध्ये केले. , आणि एक खाजगी ट्यूटर म्हणूनही त्यांनी काम केले, आणि गुंतवणूक सल्लागार व्यवसायाची स्थापना केली, परंतु हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले जेव्हा त्यांच्या ग्राहकांना कळले की तो अस्पृश्य आहे. ते अर्थशास्त्रातील राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. ते विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी झाले असले तरी, इतर प्राध्यापकांनी त्यांना त्यांच्यासोबत पिण्याच्या भांड्यवरुण वाद घालत असे. आंबेडकर, भारतातील एक अग्रगण्य विद्वान म्हणून, भारत सरकार कायदा 1919 चा मसुदा तयार करणाऱ्या साउथबरो समितीसमोर पुरावे देण्यासाठी आमंत्रित केले होते. या सुनावणीदरम्यान, आंबेडकरांनी दलित आणि इतर धार्मिक समुदायांसाठी स्वतंत्र मतदार आणि आरक्षणाची वकिली केली. हे प्रकाशन लवकरच वाचकांमध्ये लोकप्रिय झाले आणि आंबेडकरांनी पुराणमतवादी हिंदू राजकारण्यांवर आणि भारतीय राजकीय समुदायाच्या जातीभेदाविरुद्ध लढण्याच्या अनिच्छेवर टीका करण्यासाठी त्याचा वापर केला. दलित वर्गाच्या एका परिषदेतील त्यांच्या भाषणाने कोल्हापूर राज्यातील स्थानिक शासक शाहू चतुर्थाला खूप प्रभावित केले, ज्यांच्या आंबेडकरांसोबतच्या जेवणाने पुराणमतवादी समाजात खळबळ उडाली.

मुंबई उच्च न्यायालयात कायद्याची प्रॅक्टिस करत असताना त्यांनी अस्पृश्यांचे शिक्षण आणि उन्नतीसाठी प्रयत्न केले. त्यांचा पहिला संघटित प्रयत्न म्हणजे केंद्रीय संस्था बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, ज्याचे उद्दिष्ट शिक्षण आणि सामाजिक-आर्थिक सुधारणा तसेच उदासीन वर्ग म्हणून संबोधल्या जाणाऱ्या “बहिष्कृत” लोकांच्या कल्याणाला चालना देण्यासाठी होते. दलित अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी. , त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, प्रबुद्ध भारत आणि जनता अशी पाच मासिके काढली. 1925 मध्ये, सायमन कमिशनवर काम करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली, ज्यात बॉम्बे प्रेसिडेन्सी कमिटीमध्ये सर्व युरोपीय सदस्य होते. बहुतेक भारतीयांनी या अहवालाकडे दुर्लक्ष केले असताना, आंबेडकरांनी स्वतंत्रपणे भविष्यातील घटनात्मक सुधारणांसाठी शिफारसी लिहिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे अनुयायी ‘जयस्तंभ’, कोरेगाव भीमा, 1 जानेवारी 1927
आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927 रोजी कोरेगाव विजय स्मारक (जयस्तंभ) येथे दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धादरम्यान 1 जानेवारी 1818 रोजी कोरेगावच्या लढाईत शहीद झालेल्या भारतीय महार सैनिकांच्या सन्मानार्थ एका समारंभाचे आयोजन केले होते. येथे महार समाजातील सैनिकांची नावे संगमरवरी शिलालेखावर कोरली गेली आणि कोरेगाव दलितांच्या स्वाभिमानाचे प्रतीक बनले.

1927 पर्यंत डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरुद्ध व्यापक आणि सक्रिय चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक आंदोलने, सत्याग्रह आणि मिरवणुका याद्वारे त्यांनी समाजातील सर्व घटकांसाठी पिण्याच्या पाण्याचे सार्वजनिक स्त्रोत तर खुले केलेच पण अस्पृश्यांना हिंदू मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी लढा दिला. त्यांनी महाड शहरातील अस्पृश्य समाजाला शहरातील चवदार जलाशयातून पाणी काढण्याचा अधिकार मिळावा यासाठी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. , प्राचीन हिंदू मजकूर, मनुस्मृतीचा जाहीर निषेध केला, ज्यातील अनेक श्लोक उघडपणे जातीय भेदभाव आणि वर्णद्वेषाचे समर्थन करतात, आणि त्यांनी औपचारिकपणे प्राचीन ग्रंथाच्या प्रती जाळल्या. 25 डिसेंबर 1927 रोजी त्यांनी नेतृत्वाखाली मनुस्मृतीच्या प्रती जाळल्या. हजारो अनुयायी.

तीन महिन्यांच्या तयारीनंतर 1930 मध्ये आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला. काळाराम मंदिर आंदोलनात सुमारे 15,000 स्वयंसेवक जमले, ज्यामुळे ही नाशिकमधील सर्वात मोठी मिरवणूक ठरली. मिरवणुकीचे नेतृत्व लष्करी बँड, स्काउट्सच्या तुकड्याने केले होते, महिला आणि पुरुष शिस्तीने, सुव्यवस्था आणि निर्धाराने प्रथमच परमेश्वराचे दर्शन घेत होते. जेव्हा ते वेशीवर पोहोचले तेव्हा ब्राह्मण अधिकाऱ्यांनी दरवाजे बंद केले होते.

चरित्र -

हिंदू समाजातील दडपशाही प्रवृत्तीविरुद्ध केलेल्या विद्रोहाचे प्रतीक म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर होते. एका दरिद्री, अस्पृश्य, दलित, उपेक्षित कुटुंबात जन्मलेले आपली कर्मठता, दृढ संकल्पशक्ती, अदम्य भावना आणि मुत्सद्देगिरीमुळे भारतातील वर्षानुवर्षे दलित, पिचलेल्या, पिडलेल्या समाजासाठी खरेखुरे देवदूत होऊन आले. स्वतंत्र भारताच्या संविधानाचे निर्माते झाले. अशा या महान नेत्याचे चरित्र खरोखरीचे प्रेरणास्पद आहे.

निधन -

दि. डिसेंबर १९५६ रोजी या भारतातील क्रांतिकारी महामानवाचा मृत्यू झाला.

'भारतरत्न' -

भारत सरकारने भारताच्या या सुपुत्राचा सन्मान . . १९९० रोजी राष्ट्राचा सर्वोच्च "भारतरत्न" पुरस्कार देऊन केला.  

Website of ebooks on and by Dr. Bahasaheb Ambedkar in Marathi, English & Hindi with some videos related to them.

https://www.brambedkar.in/ambedkar-buddha-books/#google_vignette

 

Visitor Number:

Label Designed and Developed by - Computer Science Department